Saturday, October 16, 2021
" दुःखाला कुठे अंत "
दुःखाला आहे कुठला अंत
पुरावा हाच आहे मी जिवंत ।
खळखळाट त्या डोहात
पाणी वाटते जरी संथ ।
भोग भोगतो मी जन्माचे
वाटेना आता कशाची खंत ।
गिळून मूग मी बसलो आता
संपेल जेव्हा मी होईल शांत ।
Sanjay R.
" काहुर किती हे दाटले मनात "
काहूर किती हे दाटले मनात
सांगूं कसे तुजला मी शब्दात ।
विचार होतील व्यक्त कागदात
भावना कशा येतील लेखणीत ।
सूर गवसेना माझ्या या ओठात ।
मूक झालेत सारे, सांग कानात ।
जीवनाला तर हवी थोडी किनार
तुझ्याविना निरस सारे जगण्यात ।
Sanjay R.
Friday, October 15, 2021
आला दसरा दिवाळी येणार
आला दसरा दिवाळी येणार
चुन्नू मुंनू नवीन कपडे घेणार ।
घराला झाली रंग रंगोटी ।
दिवाळी करायची यंदा मोठी ।
मागची दिवाळी घरातच गेली
सगळी खुशी कोरोनाने नेली ।
मिठाई फटाके सगळंच आणू
आईही करेल नवीन काही मेनू ।
यंदा जायचेच मामाच्या गावी
मिरवायला थोडी हौसच हवी ।
लुटायची खूप दिवाळीची मजा
शाळेत गेल्यावर असेल सजा ।
Sanjay R.
Thursday, October 14, 2021
" ४नेमकच गेलं राहून "
काय काय सांगणार
नेमकच गेलं राहून ।
दिवस झालेत ना खूप
देवा तुला रे पाहून ।
उघडलेत आता दरवाजे
यावे म्हणतो मी जाऊन ।
दर्शनाची ओढ मनात
वाटतं यावं आता धावून ।
रागावू नको देवा आता
घेऊ नको मनास लावून ।
व्याकूळ सारेच भक्त तुझे
घेशील तूच सांभाळून ।
Sanjay R.
Wednesday, October 13, 2021
" आठवण करत नाही कोणी "
आठवण येताच का
लागते हो उचकी
सांगेल का कोणी ।
म्हणून वाटते मला
नकोच मनात आता
जुन्या त्या आठवणी ।
खबरदारीचा उपाय
येकच असा त्यावर
पिऊन घेतो पाणी ।
तेव्हा पासून सांगतो
आठवण माझी
करत नाही कोणी ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)