आठवण येताच का
लागते हो उचकी
सांगेल का कोणी ।
म्हणून वाटते मला
नकोच मनात आता
जुन्या त्या आठवणी ।
खबरदारीचा उपाय
येकच असा त्यावर
पिऊन घेतो पाणी ।
तेव्हा पासून सांगतो
आठवण माझी
करत नाही कोणी ।
Sanjay R.
आठवण येताच का
लागते हो उचकी
सांगेल का कोणी ।
म्हणून वाटते मला
नकोच मनात आता
जुन्या त्या आठवणी ।
खबरदारीचा उपाय
येकच असा त्यावर
पिऊन घेतो पाणी ।
तेव्हा पासून सांगतो
आठवण माझी
करत नाही कोणी ।
Sanjay R.
आठवणीच तर देई
क्षणाचा दिलासा ।
टाकतो कधी मग
श्वासात उसासा ।
येते कधी असेच
मुखावर हास्य ।
तर कधी डोकावते
डोळ्यात आसवं ।
सोडू कसे सांग
त्या आठवणींना ।
त्याच तर आहेत
सोबती मनाच्या ।
आयुष्याची साथ
भासे सुखाच्या ।
झेलतात वेदना
माझ्या हृदयाच्या ।
Sanjay R.
विचार करण्यास सवड नाही
आयुष्याचे गणितच अवघड ।
दिवस रात्र घालतो पालथी
जगण्यासाठीच सारी धडपड ।
बोलू कुठे मी सांगू कुणाला
निश्फळ होते सारी बडबड ।
कष्टाविना तर मिळेना काही
जीवन झाले सारेच गडबड ।
Sanjay R.
स्वप्न तुझे ते गोड किती
फुलली मनात माझ्या प्रीती ।
वाटे मजला सांगू कसे मी
स्वप्नात अपुली जुळली नाती ।
हरवून गेलो कुठे कसा ग
हात तुझा मी घेऊन हाती ।
रातराणीच्या गंधात न्हालो
हसत होता चंद्रही राती ।
सुर्याने मज मग केले जागे
आभास सारे अनोखी प्रीती ।
Sanjay R.