बोलायला नको विषय
हवे नको ते बोलायचे ।
गुपित मनातले सारेच
उघड करून सोडायचे ।
वाणी तारी वाणीच मारी
नाही कुणाला कशाचे ।
शब्दच करी कधी अनर्थ
मात्र मग चूप बसायचे ।
Sanjay R.
चहा कॉफी किती कामाची
किमतीला कमी दामाची ।
थकला असो वा भागला
बुटी जणू किती कामाची ।
मैत्री असो वा नाते असो
घट्ट मिठी तिच्या स्वादाची ।
आठवण येता हवीच वाटे
दुनिया सारी तिच्या नादाची ।
वेळ असो वा नसो कुणाला
देई फुरसत काही क्षणाची ।
गोडवा तर इतका तिचा
मिटवते दरी दोन मनाची ।
Sanjay R.