नको ठेवू मनी राग
धीराने थोडे तू वाग ।
क्रोध असे अकारण
जाग जरा तुही जाग ।
अविचार आहे कसा
अशांत मनाचा भाग
नको तापवू डोक्याला
मार्गि शांतीच्या तू लाग ।
क्रोधात होई विनाश
मनः शांती थोडी माग ।
Sanjay R.
काय राहिले काय संपले
कशाचेच नव्हते काही होणार ।
वाट या मनातली जाते दूर
झेलतो मीच का असंख्य प्रहार ।
सुख दुःखाचे क्षण येती जाती
छोट्याश्या मनात किती विचार ।
माणसांच्या गर्दीत हरवलो
का मी एकटाच झेलतो प्रहार ।
पडते उठते ते छोटेसे बालक
गेले दाखवून जीवनाचा आधार ।
Sanjay R.