नको थकुन जाऊस असा
घे भरारी विसरला कसा ।
जीवनाचा तर एकच सिद्धांत
सोडायचे नाही काहीच मधात ।
प्रसंग कठीण तर येतील वाटेत
पोहायचे आहे खळखळ लाटेत ।
वाटेत टोचतील दुःखाचे काटे
मयाजाळ ते आहे सारेच खोटे ।
Sanjay R.
दिसभर जगन्यासाठी
चालते त्याची धावपय ।
रक्त आटतवरी काम
कराच लागते ना लय ।
घरी बुढा बुढी बिमार
तान्ह पोरगं रडते भाय ।
बायको बी कावली आता
म्हने पाहू मी काय काय ।
पैसा न्हाई यक खिशात
सांगा कराव आता काय ।
किती मराव सांगा म्याच
लय दुखते राजा पाय ।
यकदाचं मरन यु दे
सांगतो तूले मरिमाय ।
कोनता पडते फरक
जगून उपेग भी काय ।
जगन्याची धळपळ हे
कराच लागन का नाय ।
उठना दादा आता तरी
मालक बोबलन पाय ।
Sanjay R.
वाटा जरी ओळखीच्या
येते कधीही वादळ
वाऱ्यासोबत होते मग
माणसांची पळापळ ।
उडवून नेतो सारेच
माजते नुसती खळबळ ।
होतो वारा शांत आणि
उरते फक्त हळहळ ।
Sanjay R.