असह्य असतो किती एकटेपणा
भाव मनातले मी सांगू कुणा ।
बोलण्यातूनच तर व्यक्त होई
परस्परांशी किती आपलेपणा ।
असह्य असतो किती एकटेपणा
भाव मनातले मी सांगू कुणा ।
बोलण्यातूनच तर व्यक्त होई
परस्परांशी किती आपलेपणा ।
मनाला पंख माझ्या
उडे दूर आकाशी ।
वाटे मज कधी
करावी मैत्री चंद्राशी ।
चांदण्यात यावे फिरून
गप्पा कराव्या रात्रीशी ।
दिवसा असतो कुठे वेळ
नाते जुळावे सूर्याशी ।
करील तोच सारी कामे
वैर नको प्रकाशाशी ।
बघून क्षितिज कधी वाटे
घ्यावे आभाळ उशाशी ।
वाऱ्यासंगे सुसाट जावे
भेटावे ग्राहताऱ्यांशी ।
Sanjay R.