ठरवून कुठे काही होते का
ठरवलेले कधी पूर्ण होते का ।
ठरवायचे आपण एक आणि
न ठरवलेले घडते दुसरेच ।
नकळत कधीतरी असेही होते
हवे ते काम आपोआप पूर्ण होते ।
नाशीबाचाच खेळ आहे सारा
कधी दुःख तर कधी सुखाचा मारा ।
Sanjay R.
किती वाट मी पाहू
कसे मनाला समजावू ।
काहूर हे या मनातले
सांग कसे मी शमवू ।
ये तू जरा कर ना त्वरा
सुखाने आयुष्य हे घालवू ।
Sanjay R.