Tuesday, February 23, 2021
" विसरलो आम्ही आजोळ "
पोटापाण्याच्या विवंचनेत
सगळेच सारं विसरले ।
पुढे जाण्याची स्पर्धा किती
स्वप्न जगण्याचेही धुसरले ।
अभ्यास असो वा नोकरी
स्पर्धेविना नाही टिकाव ।
ऐपत असो वा नसो
फक्त हवा माणसात बडेजाव ।
आई बाबा आजी आजोबा
दिवस येकट्यात घालवतात ।
कुणालाच कुणाची नाही चिंता
ओलावा नात्यातला विसरतात ।
Sanjay R.
" आपलेही घर असावे "
आपलेही एक घर असावे
मागे पुढे त्याला दार लावावे
जमपुंजी सारीच जवळची
आपल्या त्या घराला लावावी
जेणे करून आयुष्याचे उरलेले दिवस
म्हणजे म्हातारपण त्यात सुखाने जावे
निघा इथून बाहेर कोणी न म्हणावे
पण दिवस कुठे राहिलेत तसे ।
मोठ्या आनंदाने मुलांचा
संसार थाटून देतात आई वडील
आणि मग काही दिवसात तीच मुलं
त्या म्हातार्यांना घराबाहेर काढतात
आणि म्हाताऱ्यांची सारी स्वप्न
तिथेच उधळून टाकतात
कसे आलेत हे दिवस .....
Sanjay R.
Sunday, February 21, 2021
" वीरांची गाथा "
आठवा जरा त्या वीरांची गाथा
दिले स्वातंत्र्य उंचावला माथा ।
शूर वीर ते चढलेत फासावर
राष्ट्रभक्तीचे गीत गाता गाता ।
धन्य धन्य ते वीर स्वातंत्र्याचे
धान्य त्यांचे माता आणि पिता ।
घरदार सोडून झाले ते वीर
माँ भारतीची बघून व्यथा ।
नाव किती मी घेऊ वीरांचे
आठवा जरा हो त्यांना आता ।
वचन मागती आज ते सारेच
नका विसरू बलिदानाची कथा ।
Sanjay R.
Saturday, February 20, 2021
" लग्न आयुष्याचा बंध "
लग्न आयुष्याचा बंध
त्यात जीवनाचा आनंद ।
गृहस्थाश्रमीच्या वाटेत
किरण प्रकाशाचे मंद ।
एक एक पाऊल पडता
दरवळे संसारवेलीचा गंध ।
सुख दुःख होती पार
व्हायचे त्यातच धुंद ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)