आठवा जरा त्या वीरांची गाथा
दिले स्वातंत्र्य उंचावला माथा ।
शूर वीर ते चढलेत फासावर
राष्ट्रभक्तीचे गीत गाता गाता ।
धन्य धन्य ते वीर स्वातंत्र्याचे
धान्य त्यांचे माता आणि पिता ।
घरदार सोडून झाले ते वीर
माँ भारतीची बघून व्यथा ।
नाव किती मी घेऊ वीरांचे
आठवा जरा हो त्यांना आता ।
वचन मागती आज ते सारेच
नका विसरू बलिदानाची कथा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment