तुझ्या असण्याची
कल्पनाच होती
आठवणींनीच मात्र
मन व्हायचे संथ ।
मनालाही तेव्हा
होते कुठले काम
विचारांचा तसाच
झाला एक ग्रंथ ।
लिहीत गेलो
पाना मागून पाने
प्रत्येक पानाला नव्हती
दुसऱ्याची खंत ।
प्रत्येक प्रकरण होते
जीवनाचा एक अंक
कळलेच नाही मला
नी झाला अंत ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment