पत्र लिहावं म्हटलं तर
प्रश्न किती मनात ।
पेनच कुठे ठेवलं आहे
येईना हेच ध्यानात ।
शधून शोधून थकलो शेवटी
सापडले एका खाण्यात ।
बसलो मग मी पत्र लिहायला
आठवेच ना काय ते मनात ।
दूर कुठून सूर आलेत
दंग झालो त्या गाण्यात ।
राहीलच शेवटी सारं लिहायचं
काही उरलच नाही ध्यानात ।
Sanjay R.
Thursday, January 28, 2021
" पत्र लिहावं म्हटलं "
Wednesday, January 27, 2021
" रात्र "
नेहमीचाच तिचा परिपाठ
अगदी वेळेवर ती येते ।
निजवून साऱ्या जगाला
हळूच निघून जाते ।
जाण्याने मात्र तिच्या
होतात सारे जागे ।
चंद्र आणि चांदण्या
असतात तिच्या मागे ।
नाते तिचे या धरेशी
बांधले अंधाराशी धागे ।
थकलेल्यास देण्या विसावा
येई रात्र उजेडाच्या मागे ।
Sanjay R.
" हरवली माणुसकी "
शोधू कुठे मी सांगा आता
खरच का हरवली माणुसकी ।
अब्जावधीची संख्या इथे
कुणातच नसेल का आपुलकी ।
कालच तर घडले दिल्ली दर्शन
रिकाम्या डोक्याची रिकामी खोकी ।
माणूस माणसावरच चवताळून येतो
माणुसकीच तिथे पडते फिकी ।
म्हणतात कुणी मला काय त्याचे
करेल मरेल काय उरेल बाकी ।
उद्धवस्त होतेय जीवनच आता
आहे हीच अंतयात्रेची झाकी ।
Sanjay R.
Tuesday, January 26, 2021
Subscribe to:
Posts (Atom)