एक पाऊल पहिले
नक्की बसवेल जम ।
व्यर्थ नाही हो जात
केलेले सारे श्रम ।
नका बाळगू आता
मनात कुठला अहम ।
टाका काढून थोडा
असेल जो भ्रम ।
ठेवा शांत चित्त आणि
नजर थोडी नम ।
यश असेल हाताशी
जीवनाचा हाच क्रम ।
Sanjay R.
एका मागे एक सारे
जशी आहेत ही मेंढरं ।
नाही उरले विचार
डोक्यात भिनल वारं ।
प्रवाह नेईल जिकडे
वाहते तिकडे सारं ।
नाही कशाला आधार
जीवन झाले भार ।
बदलले किती आचार
उद्धवस्त सारे संसार ।
थांबतो कोण आता
झेलू सारेच प्रहार ।
Sanjay R.