Wednesday, December 2, 2020

" ट्वेन्टी ट्वेन्टी "

ट्वेन्टी ट्वेन्टी आले
कळलेच नाही कसे गेले ।
सगळेच होते घरात
वातावरण भीतीचे झाले ।

कोरोनाने केला घात
नोकरी धंदे बुडाले ।
हास्य मुखावरचे  कसे
पावलो पावली हिरावले ।

नाही शाळा नाही खेळ
मुलंही किती कंटाळले ।
ऑनलाईन ऑनलाईन
जीवनच कसे झाले ।

नको वाटतं आता सारं
पुरे वर्षच असेच गेले ।
देवा मिळू दे सुख आता
पहा वर्ष नवीन आले ।
Sanjay R.


Tuesday, December 1, 2020

" स्फोट "

शांतीच भंग पावली
स्फोटक हे वातावरण ।
होईल कधीही युद्ध
स्वस्तच झाले मरण ।
अनाचार हिंसाचार
मूल्यांचेही हरण ।
कळत नाही काहीच
कुठले हे चरण ।
शोधावेच लागेल आता
लागेलच ना सरण ।
Sanjay R.


Monday, November 30, 2020

" लगन बाबूचं जुडलं "

पस्तिशीले टेकला बाबू
जुडेच न्हाई लगन ।
सारेच होते कंटायले
समजे न्हाई करा का लागन ।

एक दिस गावात आले बुवा
होते मने पुरं, जो जे मागन ।
बाबू धरून बुवाचे पाय म्हने
मायराज होईन कवा लगन ।

लय फिरलो गाव गाव
सांगा काय करा लागन ।
बुवा म्हने बाबुले जाजो पूर्वेले
तिकडं नशीब तुह खुलन ।

फकस्त धा दिस थांब
मंग होईन तुह मिलन ।
हरिक झाला बाबुले 
म्हने होते आता लगन ।

चारच दिसात आले पावने
पोरगी पाहून जुयलं लगन ।
म्हने लय पावला मायराज
महा जमलं आता भजन ।

लयच खुश होता बाबू
ज्याले त्याला देये भाषन ।
तारीफ करे मायराजाची
म्हने किरपा त्यायचीच असन ।
Sanjay R.

Sunday, November 29, 2020

" कहाणी आसवांची "

नाही आयुष्याची कथा
आहे जीवनाची गाथा ।
कहाणी या आसवांची
ही जगण्यातली व्यथा ।

वनवासी झाला राम
ठरली गुन्हेगार सीता ।
घेतले उदरात शेवटी
धरती तिचीच माता ।

महाभारत घडले सारे
मान दौपदीचा रिता ।
वैकुंठाला पोचले सारे
रचल्या किती चिता ।

तीच भोगते दुःख सारे
किती विरोधी ही प्रथा ।
इतिहास या आसवांचा
झुकतो का इथेच माथा ।
Sanjay R.


Saturday, November 28, 2020

" कधी येशील परत "

आले आभाळ भरून

येशील कधी तू परत ।

वाट किती पहायच

दिवस आला सरत ।

मधेच गेला डोकावून
तळपता सूर्य आकाशात ।
घेतले धरेने न्हाऊन
उष्ण तीक्ष्ण प्रकाशात ।

आता येरे ये तू पावसा
पाहू नकोस रे अंत ।
शिणले रे डोळे सारे
कळला का तुज आकांत ।

बरस बरस तू रिमझिम
कर तप्त धरा ही शांत ।
गालात फुलव तू हास्य
सारेच होतील मग निवांत ।
Sanjay R.