काय लिहिणार रोजनिशी
जीवनच आपले भंगार ।
अजुबाजूला बघतो जेव्हा
पेटतो मस्तकात अंगार ।
जिकडे तिकडे सावळा गोंधळ
पेटते दहशतीची चिंगार ।
माणुसकीच उरली नाही
फक्त माणसं इथे रंगणार ।
Sanjay R.
मनात उठलेले वादळ
असते ती इच्छा ।
करते सदा पाठलाग
सोडत नाही पिच्छा ।
शक्ती तिची अपार
असो नसो सदिच्छा ।
पूर्ण होता विसावे
फुले अंतरात गुच्छा ।