तू माणुसकीला रे कसा
आहेस एक कलंक ।
सम्पवलेत किती रे आजवर
तू असेच जीवनाचे अंक ।
वासने पाई तुझ्या रे गाठला
तू क्रूरतेचा उच्चांक ।
हो माणूस तू आतातरी
नको कोरुस माथ्यावर कलंक ।
Sanjay R.

तू माणुसकीला रे कसा
आहेस एक कलंक ।
सम्पवलेत किती रे आजवर
तू असेच जीवनाचे अंक ।
वासने पाई तुझ्या रे गाठला
तू क्रूरतेचा उच्चांक ।
हो माणूस तू आतातरी
नको कोरुस माथ्यावर कलंक ।
Sanjay R.
गर्दी असो वा मी एकटा
नसता कुणाची सोबत
करतो मी संवाद मग
माझ्याच मनाशी ।
काल्पनिक ते सारे
चित्र उभे होते पुढ्यात
त्यात ठेवतो मी मलाच
सगळ्यांच्या मधात ।
मनाला माझ्या हवं तसं
आणतो घडवून सारं
आणि सहजच हसतो
आपल्याच मनात ।
उघडते दार आनंदाचे
वेचतो क्षण जीवनाचे
अनुभव तोही आगळा
दिवस जातात मग सुखात ।
Sanjay R.
रे माणसा किती तू महान
वेगळा तू हे तुझे रे ज्ञान ।
बुद्धिवंत तू विचारीही तू
लौकिक तुझा ती तुझी शान ।
मेहनतीने तुझ्या रे बघ
केलेस तू पालथे सारे रान ।
वेळेस तू प्रगती पथावर
आरोग्य तंत्रज्ञान विज्ञान ।
मात्र कधी का ते असा
सोडतोस तू आपले भान ।
विकून होतोस मोकळा
स्वतःचाच मान आणि सन्मान ।
करून घात तू माणसाचाच
विकतो कसा ते आपलेच इमान ।
खून बलात्कार हिंसाचार
फडकवतो यातच तू निशान ।
बदल रे थोडा तरी आता
हो माणूस तू त्यात तुझा रे प्राण ।
Sanjay R.
एक अंधारी रात्र
असावी अमावसेची ।
आकाशात चांदण्या
दाटीवाटीने बसलेल्या ।
मधेच एखादा काजवा
चमचम करत निघून जातो ।
थंड गार वातावरणात
दूर एक शेकोटी पेटतेय ।
दूर असूनही तीची
मनाला जाणवत होती ऊब ।
मधेच कुठेतरी झाडावर
फडफड व्हायची पक्षाची ।
रातकिड्यांचा आवाज
शांततेला बसू नव्हता देत स्वस्थ ।
अशीच निघाली रात्र आणि
मग दिली कोंबड्यांने बाग सूर्याला ।
हळूच अवतरला सूर्य
आणि सरले साम्राज्य अंधाराचे ।
Sanjay R.
अशी कशी रे ही दारू
सवयीचा तू गुलाम झाला ।
उठून सक्काळी कसा
हवा तुला रे एकच प्याला ।
घरदार शेती वाडी गेले सारे
संसाराचाही घात झाला ।
एक घुट पिण्यासाठी रे
भीक मागायचा दिवस आला ।
विनाशाचा मार्ग तुझा
डोक्यात तुझ्यारे अंधार झाला ।
कळेल कधी सांग तुला
यमराज तुझ्या रे दारी आला ।
Sanjay R.