नशीबातच माझ्या आहे
फक्त वाट पाहणं ।
ताटकळत बसायचं
उघडून डोळ्याचं पापनं ।
मनात वादळ विचारांचं
लागते श्वासांना धाप ।
कधी कधी तर होतो
अंतरात थरकाप ।
नको वाटतं आता
वाट कुणाची बघणं ।
स्वछंद कसं असत
बघावं ते जगणं ।
Sanjay R.

नशीबातच माझ्या आहे
फक्त वाट पाहणं ।
ताटकळत बसायचं
उघडून डोळ्याचं पापनं ।
मनात वादळ विचारांचं
लागते श्वासांना धाप ।
कधी कधी तर होतो
अंतरात थरकाप ।
नको वाटतं आता
वाट कुणाची बघणं ।
स्वछंद कसं असत
बघावं ते जगणं ।
Sanjay R.
व्हायचे असेल महान
करून घ्यायचा सन्मान ।
योग्यता असो नसो
बस ठेवायचे स्वतःचे ध्यान ।
मी मोठा मी मोठा करत
मिळवायचा आपलाच मान ।
ओळखतात लोकं सारे
हे मिरवणुकीतलं निशान ।
स्वतःच्या स्वार्थापाई
होतो कसा तो बेभान ।
बुद्धी शुद्धी नसतेच त्याला
मिरवतो सारे ठेऊन गहाण ।
हिरा खरा दूरच असतो
असतो त्याला आत्मसम्मान ।
अंधारातही चमचमतो हिरा
त्याची तर अलगच शान ।
Sanjay R.
लय झालं जेवण
मुन टाकलं आंग ।
दोस्त आले सपनात
म्हने जाचं कुठं सांग ।
इचार केला थोडा
मनलं जाऊ भूत पाहाले ।
भेता का लेकहो
झाले आडदांड काहाले ।
झाले मंग सरळ
म्हने जाऊ भुताच्या घरी ।
घेऊ शोध जरासा
गोष्ट हाये का खरी ।
गेलो मंग सारेच
हाये तिकडं दरी ।
संग वंग होते सारे
पन भेव वाटे तरी ।
जवा पोचलो तेथ
अंधार लय भारी ।
पांढरे कपडे घालून
होती नाचत परी ।
झुंन झुंन तिचे चाळ वाजे
मनलं गोठ हाये खरी ।
बायको हालवे जोरात
पायतो त मी घरी ।
Sanjay R.
तुटला धागा
विखुरले मणी
वेचू कसे मी
सांगा ना कोणी ।
धो धो पाऊस
पडतंय पाणी ।
सुचतात कशी
पावसाची गाणी ।
फुलते अंगणात
रात राणी ।
दरवळतो गन्ध
रात्र दिवाणी ।
निशब्द झाली
मुखातली वाणी ।
ऐकायची आता
विरहाची गाणी ।
Sanjay R.