Tuesday, December 24, 2019

" रे बळीराजा "

रे बळीराजा…..

सहनशक्ती तुही सांग
किती हाये रे अपार ।

कयनार न्हाई कधीच तुले
थ्या चाकूची रे धार ।

न्हाइ ठाव, अजब रे
हाये हे सरकार ।

पोटावर तुह्या होते
किती किती रे वार ।

सांग तूच आता तुले
हाये कोनाचा आधार ।

किती रे झेलशीन तू
हे अशे परहार ।

काया मातीत राबतो
न्हाई तुले दिस वार।

घरात जगतेत किती
सांग किती तुहा भार ।

पै पै लागे मातीत
घेते पाऊसच इसार।

सावकारापुढ कसा
होतो रे तू लाचार ।

तिसरा मधीच कोनी येते
करते तुह्या व्यापार ।

खिसा घेते हिसकुन
आनं सरतेत ईचार ।

सांग ठनकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।

नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।

फेक फंदा फाशीचा
दे घराले तू आधार ।

टाक उलटून आता
सरकारचा ह्या दरबार ।

जयुन तू रे जयनार किती
राखे ईना काय उरनार ।

टाक जायुन तू आता
पडू दे त्यांयचेच निखार ।

संजय रोंघे,
नागपूर .
मोबाईल : 8380074730

" तुझ्या पाई रे माणूस हरला "

काय झाले कुणास ठाऊक
शांतीचा तर रंगच पालटला ।
मोर्चा दगडफेक जाळपोळ
हिंसेचा तर डोंब उसळला ।

सगळीकडे अफवांचा बाजार
सुत्रधाराने एक डाव रचला ।
जीव कुणाचा जातोय सांगा
अविचारी तर तिथेच फसला ।

शांती अहिंसा गांधींचा मार्ग
कसा रे माणसा तू विसरला ।
हो ना थोडा शांत जरासा
तुझ्यापाई रे माणूसच हरला ।
Sanjay R.

Friday, December 20, 2019

" खोटा मुखवटा "

" खोटा मुखवटा "

कोण खोटा कोण खरा
समजणे कठीण आहे ।
ओढून मुखवटा निघतात सारे
ते तर त्यांचे रुटीन आहे ।

धडधाकट ही करतो सोंग
ढोंग समजणे कठीण आहे ।
पैशासाठी करतील काही
ते तर त्यांचे रुटीन आहे ।
Sanjay R.

" समृद्ध भारत "

देश भारत माझा
समृद्धीने भरलेला ।
भिन्न भाषा भिन्न धर्म
विविधतेने फुललेला ।

प्राचीन इथला इतिहास
संस्कृतीने सजलेला ।
शूरवीरांची गाथा इथली
पराक्रमानी धजलेला ।

स्वातंत्र्याची घेऊन धुरा
तिरंग्यापुढे झुकलेला ।
देऊन आहुती प्राणाची
केले स्वतंत्र भारताला ।

गांधी नेहरू भगतसिंह
इथेच आले जन्माला ।
संत महात्मे इथलेच सारे
वंदन करतो मी मातीला ।
Sanjay R.

" माणसापुढे माणूस लाचार "

कोण कुणाचा आधार
माय बाप ही वाटे भार ।

बदलले सगळेच आचार
अंतरात या कुठले विचार ।

झाले पुसट सारे उपकार
माणसाचाच होतो प्रहार ।

काळजाला विकृत आकार
जडत चालला हा विकार ।

जगतो करून तो दुराचार
माणसापुढे माणूस लाचार ।
Sanjay R.