झाली सुरू साफ सफाई
आली दिवाळी , करा घाई ।
गर्दी पाई रस्ते झाले जाम
दिवाळीचा किती तामझाम ।
दिवे पणत्या कपडे खरेदी
आभाळास टेकले सोने चांदी ।
मंदी चा हा दौर आला
खिशावरती महागाईचा घाला ।
फटाक्यांना सरकारी बंदी
गरिबांना कुठे दिवाळीची धुंदी ।
Sanjay R.

झाली सुरू साफ सफाई
आली दिवाळी , करा घाई ।
गर्दी पाई रस्ते झाले जाम
दिवाळीचा किती तामझाम ।
दिवे पणत्या कपडे खरेदी
आभाळास टेकले सोने चांदी ।
मंदी चा हा दौर आला
खिशावरती महागाईचा घाला ।
फटाक्यांना सरकारी बंदी
गरिबांना कुठे दिवाळीची धुंदी ।
Sanjay R.
ते समोर दिसतंय ना
ते आहे क्षितिज ।
वाटतं किती जवळ
पण आहे किती दूर ।
सांगायची आई लहानपणी
ते ना आहे फार दूर ।
असा होऊ नकोस आतुर
आज वाटतं किती ते फितूर ।
नाहीच कुठे अस
जमिनीला टेकलेलं ।
आकाश दूरच असतं
अंतर त्यानं राखलेलं ।
मनही असच असतं
क्षणात इथे तर
माहीत नाही क्षणात कुठे ।
असतो नुसता आभास
त्यातच रामयचं ।
सागर दुःखाचा इथे
दुःख आपली विसरायचं ।
चल जाऊ थोडं पुढे
आहे अजून खूप जगायचं ।
Sanjay R.
कधी आठवायचं
कधी विसरायचं
कळतच नाही ना
काय कसं करायचं ।
सांगा कसं वागायचं
कानांनी ऐकायचं
डोळयांनी बघायचं
पटेल मनाला तेच
फक्त करायचं ।
दुःखाला सरायच
आनंदाला घ्यायचं
जीवन हे अनमोल
आहे ना जगायचं ।
Sanjay R.
मन असते कुठं
खूप खोल अंतरात ।
मन असतं कसं
सूक्ष्म की विशाल ।
मात्र असत ते
नेहमीच विचारात ।
क्षणात इथे तर
क्षणात तिथे ।
स्वतः माणूस पोचणार नाही
आधीच ते पोचते तिथे ।
कधी साक्षात
तर कधी स्वप्नात ।
फिरून फिरून
येईल परत अंतरात ।
तिथूनच घेईल झेप
दूर अंतराळात ।
नसेल जीथे मर्यादा
विचार मनाचे अमर्याद ।
न भाषा न शब्द
नसते कधीच स्तब्ध ।
जीवनाचा चाले विचार
हेच मनाचे प्रारब्ध ।
Sanjay R.
मन किती हे वेडं
धावते पुढं पुढं ।
चाल त्याची दुड दुड
नाही थांबत थोडं ।
पुढे नाविण्याचं घोडं
मनी कुतुहलाची खोड ।
शोधी साऱ्यावर तोड
मिरवी मीच मोठा लोड ।
करी कधी धर सोड
चाले मनात तोडफोड ।
दुःखाला आनंदाची जोड
वाटे मग सारेच गोड ।
Sanjay R.