लागली आज संचारबंदी
कमी झाली मनातली रुंदी ।
नाही ही कुठली धुंदी
अंतरात अंतरालाच बंदी ।
वाटे जणू हृदयावर बंदी
ओठांवर शब्दांची मंदी ।
काढून सोने लावली चांदी
हलते मान जसा हा नंदी ।
Sanjay R.
लागली आज संचारबंदी
कमी झाली मनातली रुंदी ।
नाही ही कुठली धुंदी
अंतरात अंतरालाच बंदी ।
वाटे जणू हृदयावर बंदी
ओठांवर शब्दांची मंदी ।
काढून सोने लावली चांदी
हलते मान जसा हा नंदी ।
Sanjay R.
सूर्य सकाळी आज
उगवलाच नाही ।
साम्राज्य धुक्याचे
झाले दिशा दाही ।
आले भरून किती
आभाळ काळे काळे ।
प्रकाश झाला मंद
दिसेना आकाश निळे ।
धारा पावसाच्या
गेल्या येऊन चार ।
भिजला गुलाब चिंब
पाकळ्यांवर प्रहार ।
Sanjay R.
झाले सारेच शांत
मन तरीही अशांत ।
शोधू कुठे तुला मी
क्षितिजास नाही अंत ।
लोपला सूर्य त्या कडेला
झाला प्रकाश निवांत ।
काळोख दाटून आला
नाही कुणास खंत ।
आकाश भरून आले
चांदण्या तिथे अनंत ।
हळूच मग चंद्र आला
होऊन एक संत ।
Sanjay R.
शोधले चाक मानवा
वेग प्रवासाला आला ।
शेकड्याने दूर अंतर
प्रवास क्षणाचा झाला ।
जळत होतो मनात किती
प्रवास आयुष्याचा झाला ।
अंत आला जवळ जेव्हा
बघा अग्नीचा जाळ झाला ।
कुठे अग्नी कुठे चाक
मनात कुठे उरला धाक ।
चकावरती प्रवास होतो
विझता अग्नी उरते राख ।
Sanjay R.