Tuesday, August 20, 2019

" यवतमाळ साहित्य मंच "

" पाणी पाणी झाली धरती "

पावसाच्या वाटेवर
होती नजर वरती ।
आला उशिरा किती
पाणी पाणी झाली धरती ।
घरदार बुडाले पाण्यात
वाहून गेली स्वप्न सारी ।
दिवस मोजता मोजता
जीवनच झाले भारी ।
नाही आडोशाला छत
पावसाने केली गत ।
कसा दिवस कशी रात
उरले पाणी ओंजळीत ।
Sanjay R.

Monday, August 19, 2019

" नाही अशा खोटी "

अजूनही आहे
मनात माझ्या आशा ।
कोण म्हणतय
येताहेत ज्या लाटा
साऱ्याच निराशा ।
भरती नंतर असते
सागरात ओहोटी ।
हवा थोडा सय्यम
नाही आशा खोटी ।
सुर्यास्ता नंतर जरी
होते काळी रात्र ।
सुर्योदया नंतर
सूर्याचे एक छत्र ।
जीवन हाही आहे
एक अथांग सागर ।
सुख दुःखाच्या लाटांतून
भरायची आपली घागर ।
संपणार नाही ही वाट
पुढे अजून जायचे ।
जगता जगता अलगद
आनंद त्यातले वेचायचे ।
Sanjay R.

Sunday, August 18, 2019

नजर दूर वाटेवर


फडफड तनात होते
तडफड मनात होते ।

काळजास चाहूल होता
धडधड उरात होते ।

नजर दूर वाटेवर
मनही आतुर होते ।

क्षण अधीर होता
डोळ्यात पूर येते ।
Sanjay R.

Saturday, August 17, 2019

" माझी कविता "

मनात माझ्या तू
सांगू कसे तुला ।
छळतेस किती कशी
स्वप्नात तू मला ।

आहेस तू कविता
शब्दांची तू सरिता ।
आहेस तूच मनात
म्हणून
फुलते ही कविता ।

श्रावणातली सर तू
क्षणात दूर जाते ।
परी अंतरात माझ्या
आठवण तुझीच राहते ।

भिजून चिंब धरा ही
हिरवे गीत गाते ।
पूर आठवणींचा बघ हा
नेत्राच्या कडेतून वाहते ।
Sanjay R.