Monday, August 19, 2019

" नाही अशा खोटी "

अजूनही आहे
मनात माझ्या आशा ।
कोण म्हणतय
येताहेत ज्या लाटा
साऱ्याच निराशा ।
भरती नंतर असते
सागरात ओहोटी ।
हवा थोडा सय्यम
नाही आशा खोटी ।
सुर्यास्ता नंतर जरी
होते काळी रात्र ।
सुर्योदया नंतर
सूर्याचे एक छत्र ।
जीवन हाही आहे
एक अथांग सागर ।
सुख दुःखाच्या लाटांतून
भरायची आपली घागर ।
संपणार नाही ही वाट
पुढे अजून जायचे ।
जगता जगता अलगद
आनंद त्यातले वेचायचे ।
Sanjay R.

No comments: