आयुष्यभर माणसाला
करावे लागतात किती कष्ट ।
मागेच लागून असते
भूक पोटाची किती ती दुष्ट ।
टीचभरच ना हे पोट
भूक बघा ही त्याची किती ।
तरी इच्छेचा महासागर तो
नेहमीच असते ना ती रीती ।
आयुष्यभर करून कष्ट
होते शरीराची किती क्षती ।
लाभते म्हातारपण मग
आणी सोसवत नाही गती ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment