शब्द च तर भाव
सांगून जातात ।
बाकी काय असतं
आपल्या हातात ।
शब्दांची होते कविता
भावार्थ तिचा किती ।
हृदयात जेव्हा ठसते
भावना होते रीती ।
चार ओळींची चारोळी
नजरेतून जाते गळी ।
मन होते आनंदी
फुलवत गालावर खळी ।
Sanjay R.
शब्द च तर भाव
सांगून जातात ।
बाकी काय असतं
आपल्या हातात ।
शब्दांची होते कविता
भावार्थ तिचा किती ।
हृदयात जेव्हा ठसते
भावना होते रीती ।
चार ओळींची चारोळी
नजरेतून जाते गळी ।
मन होते आनंदी
फुलवत गालावर खळी ।
Sanjay R.
तू स्वप्नपरी
सुन्दरी खरी ।
रूप गुण
तू मनोहारी ।
भासते मज
सुशांत विचारी ।
भूषण तूझेच
इंद्र दरबारी ।
लौकिक तुझा
दिशा चारी ।
रण रागिणी तू
आहे परोपकारी ।
संजय R.
तुझ्याच साठी सखे
असते माझी कविता ।
मनात भाव कितीक
करतो घडा रिता ।
पदो पदी क्षणो क्षणी
तू असतेस माझ्या मनात ।
शब्द होऊन अवतरतेस
झुलते मन क्षणात ।
शब्दांच्याही पलीकडे
लपल्या आहेत व्यथा ।
सांगू कसे तुला मी
अंता वीणा ती कथा ।
थांबवू नको तू हसणे
नको वाटे तुझे रुसणे ।
जीवन ही एक गाथा
हवे त्यात तुझे असणे ।
Sanjay R.
ना भुले है कुछ
ना भुलेंगे कुछ ।
है अरमान वही
दिलसे तो पुछ ।
बाते है वही
जो दिलने कही ।
आज भी है
दिलमे सही ।
यादे अब वही
न भुलना कभी ।
दिल ही दिलका
है साथी अभी ।
Sanjay R.
कशाला ऐकतो रे हा पाऊस
बुडवायची तर त्यालाच हाऊस ।
आलाच तर येणार खूप
पाणी पाणी होणार पाऊस ।
नाहीतर कोरडे आभाळ सारे
घोर जीवाला नको रे लाऊस ।
पाण्याविना जीवन नाही
गीत पावसाचे नको गाऊस ।
जंगल झाडे लयास गेले
हिसका तुझा रे नको दाऊस ।
थोडा थोडा रोज तू पड
सोडून आम्हा नको तू जाऊस ।
Sanjay R.