Tuesday, January 8, 2019

" भारत माझा बदलला का "

वाटते भीती, तथ्य किती
कुणी कुणाला सांगेल का ?

एकोपा तर दिसतो अजूनही
अंतरातच तो हरला का ?

मीच म्हणतो, सारेच जाणतो
विश्वास खरंच सरला का ?

माणसा माणसात भेद कशाचा
विचारात तो फिरला का ?

शेजार्याला बघतो मी
त्रयस्थाला तो कळला का ?

सांगा मला जरा कुणी
भारत माझा बदलला का ?

नको नको ते विचार येतात
माझा मीच बदलला का ?
Sanjay R.


Sunday, January 6, 2019

" किती ही थंडी "

किती ही थंडी
होते उलार बंडी ।
थरथरते अंग
गुल होते दांडी ।
वाटे प्यावा गरम चहा
पडतात रुपये दहा ।
लाकडं किती जाळायची
झाडं होताहेत स्वाहा ।
कडाका थंडीचा कसा
वाटे अति भारी ।
मी मी म्हणणारी बघा
कापताहेत सारी ।
नकोच वाटते थंडी
होते उलार बंडी ।
होत नाही सहन
दाखवा लाल झंडी ।
Sanjay R.

Sunday, December 30, 2018

" विचार "

असेच काही तरी
विचार येतात मनात ।
शब्द रूपानं अवतरतात
काव्य होऊन पानात ।
Sanjay R.

Friday, December 28, 2018

" जिंदगी क्या है तू "

देखी जब तस्वीर उनकी ।
न जाने दिलको क्या हुवा ।
खो गये तस्वीरमे और लगा
जिंदगी है आग और हम धुवा ।

हर कदम हर वक्त बस
जलते रहे हम ।
ना आखो मे असू
ना दिल मे गम ।
फिरभी लागता
जिंदगीमे कुछ तो है कम ।

रास्ता लंबा कितना
चालते राहना है अब ।
सुख दुःख तो साथी है
पर कोई न होगा तब ।
Sanjay R.

" इयर एन्ड "

सरले हे वर्ष आता
मनात बरेच उरले ।
झाले किती पूर्ण आता
निश्चय जे जे धरले ।
जिकण्याचे स्वप्न होते
परी तेचि हरले ।
वर्षाचे दिवस किती
मोजून पूर्ण भरले ।
अजूनही मन हे रिते
ठाव कुणास किती उरले ।
जगायचे आनंदात अजून
निश्चय मनाशीच ठरले ।
Sanjay R.