काश्मीरची ऐकतो रोजच खबर
पावलागणिक सापडेल कबर ।
नाही जिथे युद्धाचे मैदान
नाही कुणाला कुणाचे आव्हान ।
लपूनच होतो तिथे हल्ला
देशद्रोह्यांचा असतो सल्ला ।
त्यातही शिजते राजकारण
झाकतात डोळे पाहून मरण ।
नरम धोरणास कोण घालतो भीक
मत पेट्यांचीच तर काळजी अधिक ।
कितीक झाले सरकारी इशारे
अंकात मोजायचे तिथे मरणारे ।
सांगा कुणी कधी लढणार
भेकडांची कंबर तोडणार ।
झुकवाल काहो तिरंगा तेथे
बोलघेवडे हे आमचे नेते ।
मरणाऱ्यांची किंमत कुणाला
फौज उभी का फक्त मरणाला ।
का होईल बंद पडतील खंड
राहील हातातच तुमचा दंड ।
उठा थोडे सारे जागे व्हा
घेऊन निर्णय करा स्वाहा ।
Sanjay R.