मिळुन स्वातंत्र्य आम्हास
झालो स्वतंत्र आम्ही जरी ।
मोजू नका हो दिवस
लोटलेत वर्ष कितीतरी ।
करुनी संशोधन अपार
पोचलो आम्ही मंगळा वरी ।
तरी लक्ष कुणाचे आहे
जगतो पारतंत्र्यात शेतकरी ।
रात्रंदिवस मरेस्तो राबतो
एकही दाना नाही घरी ।
वाट पाहतो चातक होऊन
पडतील कधी पावसाच्या सरी ।
बी बियाणे खते औषधे
होतो असाच कर्जबाजारी ।
एकच पाऊस देतो धोका
गाळून पडते मेहेनत सारी ।
कुणास काय जगतो कसा
किंमत शून्य आहे सरकारी ।
घेऊन गळफास लटकतो जेव्हा
करता करविता तोच हरी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment