Tuesday, March 27, 2018

" सुर्याला इतका ताप का आला "

सहजच मनात
विचार आला
सुर्याला इतका
का ताप आला ।

चटचटतं अंग
नि घामाच्या धारा ।
गेला कुठे असेल
थंड गार वारा ।

झाडांचीही पानं
गळुन दुर गेली ।
छोटी छोटी रोपटी
केव्हाच मरुन गेली ।

नद्या नाले विहीरी
सुकुन कोरडे झाले ।
व्याकुळ झाले सारे
गळे सुकुन गेले ।

थेंब थेंब पाणी
मृगजळ झाले ।
डोळ्यातले अश्रु
रुसुन आज गेले ।
Sanjay R.

No comments: