Wednesday, March 14, 2018

" विचारी आमचा शेतकरी "

आहे लयच विचारी
गरीब आमचा शेतकरी ।

परी खोदुन आहे मोठी
दरी त्याच्या वाटेवरी ।

वरषानु वरषे चालली
असिच त्याची वारी ।

चोरायचाच गराडा आहे
सभोवताल त्याच्या दारी ।

संकटानी घेरले त्यास
पहा दिशा चारी ।

नाही निसर्गाचा साथ
व्यापारीही झाले भारी ।

पडतो पोटाला पिळा
उघडी नागडी मुलं घरी ।

कधी येशील रे धाउन
सांग तु देवा हरी ।

कधी होतिल का जागे
लोकं हे सरकारी ।

तुटेल नाही तर एक दिस
करा कोनितं काहितरी ।

आसवं डोळ्यात थबकले
एकेक दिवस जातो भारी ।
Sanjay R.

No comments: