आहे लयच विचारी
गरीब आमचा शेतकरी ।
परी खोदुन आहे मोठी
दरी त्याच्या वाटेवरी ।
वरषानु वरषे चालली
असिच त्याची वारी ।
चोरायचाच गराडा आहे
सभोवताल त्याच्या दारी ।
संकटानी घेरले त्यास
पहा दिशा चारी ।
नाही निसर्गाचा साथ
व्यापारीही झाले भारी ।
पडतो पोटाला पिळा
उघडी नागडी मुलं घरी ।
कधी येशील रे धाउन
सांग तु देवा हरी ।
कधी होतिल का जागे
लोकं हे सरकारी ।
तुटेल नाही तर एक दिस
करा कोनितं काहितरी ।
आसवं डोळ्यात थबकले
एकेक दिवस जातो भारी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment