काल बोलता बोलता सहज विषय निघाला मैत्री कशी असावी । मी म्हटलं क्रुष्ण सुदाम्या सारखी असावी । क्रुष्णाला आठवण यावी आणी सुदाम्याला उचकी लागावी ।
खरच अशीच असावी मैत्री ।
मी ई म्हणावं आणी मित्रानं री ओढावी । आपल्याला इच्छा व्हावी आणी मित्रानं ती पुर्ण करावी । दुखाःत दुखाःचा आणी सुखात सुखाचा वाटेकरी व्हावा । मनात नेहमी ओलावा असावा ।राग द्वेश लोभ मोह मत्सर यांचा लवलेशही नसावा । मित्र असाच असावा । हसतांना तोही हसावा । रडतांना अश्रु व्हावा । असला मीत्र तर असाच असावा । नाही तर मित्रच नसावा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment