Thursday, September 3, 2015

गरीबी

तुच रे जवाबदार माणसा ।
नकोच ना तला पाउस ।
तोडुन जंगल उजाडलं सारं ।
फिटउन घे आता आपलीच हौस ।
Sanjay R.

गरीबीच आहे
पाया आमच्या देशाचा ।
दाखवतो दया माया
हा किती मोठेपणा
आमच्या मनाचा ।
सगळेच दाखवतात
थोडी कळकळ आणी
चिमुटभर मळमळ ।
थंडच आहे रक्त उरात
देणे घेणेच नाही कुणा
होणार कशी सळसळ ।
जगतो बिचारा कसातरी
अन्नासाठी दारोदारी
मेला गेला नाही सुतक ।
दिली म्हणे सरकारनं
अन्न सुरक्षेची हमी
का मग ही अन्नाची कमी ।
Sanjay R.

रात्रीचे काही वेगळेच रंग
सगळेच कशे असतात दंग ।

हवेत दरवळतो रातराणीचा  सुगंध
चंद्र असतो मस्तीत चांदणीच्या संग।

मधेच चमचमतो कळोखात काजवा
रातकिड्यांची समधी होते भंग ।
Sanjay R.

जायचं जर असेल जिवनात पुढे
अभ्यासाचे ओझे वाहायचे थोडे ।

एक एक पाउल मग ठेवायचे पुढे
सर होतील श्रमाने सारे विद्येचे धडे ।

झिजवायचे आपले पायातले जोडे
शर्यत जिवनाची जिंकतील घोडे ।
Sanjay R.

किती तु लावलीस ओढ
तुझ्या विचारानी  मग
वाटतं सारंच गोड ।

तुझं हळुच हसणं आणी
तिरक्या नजरेनं बघणं
दोन्हीची अप्रतीम जोड ।
S. Ronghe









No comments: