निघाली आज नभांची स्वारी
बरसणार कधी आमच्या दारी ।
चिंतेत पडले सारे शेतकरी ।
घरात आहे मुलगी आजारी ।
करायची होती पंढरीची वारी ।
का अंत पाहतो पांडुरंग हरी ।
बरसु दे आता पावसाच्या सरी ।
जाउ नकोस दुर फीर माघारी ।
जगलो वाचलो तर करील वारी ।
Sanjay R.
कविता कुणाची प्राण आहे ।
कुणी कवितेचा फॅन आहे ।
कवी स्वत: एक ध्यान आहे ।
कवितेनच त्याचा सन्मान आहे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment