करू नकोस तू वाद
देईल तुला मी साद ।
तुला आवडेल सारे
देशील मग तू दाद ।
शब्द नि शब्द मग
ठेवशील तूच याद ।
विसर तू मनातले
दे सोडून हा नाद ।
जुनाच आहे हाही
भांडणाचा प्रवाद ।
करू नकोस तू वाद
येईल तुलाच याद ।
Sanjay R.
वाटा जरी ओळखीच्या
येते कधीही वादळ
वाऱ्यासोबत होते मग
माणसांची पळापळ ।
उडवून नेतो सारेच
माजते नुसती खळबळ ।
होतो वारा शांत आणि
उरते फक्त हळहळ ।
Sanjay R.
अष्टाक्षरी
" ओला सुगंध मातीचा "
गेले आभाळ झाकुनी
भासे प्रहर रातीचा ।
वाहे वादळी वारा तो
जसा निधड्या छातीचा ।
कुठे पडली वीज ती
झाला प्रकाश वातीचा ।
सरी सूटल्या नभात
भिजे देह धरतीचा ।
धरा झाली ओली चिंब
पडे पाऊस प्रीतीचा ।
नाही फुलला मोगरा
ओला सुगंध मातीचा ।
बळी राजा सुखावला
आहे तोच हिमतीचा ।
साथ नको सोडू आता
भार झेलतो शेतीचा ।
स्वप्न बघतो डोळ्यात
शेतकरी तो जातीचा ।
सज्ज तो जाहला द्याया
नारा हरित क्रांतीचा ।
Sanjay R.