Tuesday, October 13, 2020

" कवितेची निवड "

यवतमाळ साहित्य मंच द्वारा आयोजित काव्य स्पर्धेत माझ्या नाती गोती या कवितेची निवड, आयोजकांचे खूप खूप आभार .

" नाती गोती "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

लुटारूंचा बोल बाला
भोगवाद्यांचा अजब न्याय ।

कष्टकऱ्यांचे आटते रक्त
सहन करतो सारे अन्याय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.

Monday, October 12, 2020

" सावली तू "

तू जिथे मी तिथे
तुझ्याविना कोण कुठे ।
डोळ्यात तू अंतरात तू
शोधतो तरी आहे कुठे तू ।

स्वप्नात कधी साक्षात तू
असूनही जवळ दूर किती तू ।
दुःखात तू आनंदात तू
आहेस माझ्या जीवनात तू ।

सुगंध तू बेधुंद ही तू 
प्रत्येक माझ्या श्वासात तू ।
आशा तू आकांक्षा तू
पूर्णत्वाची तर भावना तू ।

बांधले नात्यात ती गाठ तू
उभी मागे माझ्या पाठ तू
होतेस कधी माऊली तू
सोबती माझी सावली तू ।
Sanjay R.



Saturday, October 10, 2020

" उरते मनात इच्छा "

इच्छा मनात अनेक
बघतो स्वप्न त्यांचे ।
होती पूर्ण सारे
सारे आभास मनाचे ।

दूर जळतो दिवा
प्रकाश लखलख त्याचा ।
अंतरात जळते मन
संदर्भ त्यास कुणाचा ।

जग जिंकावे ही इच्छा
देईल कोण सदिच्छा ।
रात्र असते भयाण
स्वप्न करते पिच्छा  ।

स्वप्ना विनाची रात्र
मोडून झोप जाते ।
निज निज करतो मनात
स्वप्न सोडून जाते ।

उरते मनात इच्छा
सांगू कसे कुणाला ।
सोडून सारेच जायचे
मन समजावी मनाला ।
Sanjay R.


" लागलो शेवटी मार्गाला "

एकटाच होतो चालत
विराण त्या रस्त्यावर ।
नव्हते मागे पुढे कोणी
रस्ताच उठला जीवावर ।

झाडं झुडपं पशु पक्षी
गेलेत कुठे नव्हते माहीत ।
मात्र सूर्य होता डोक्यावर
अंग अंग माझे जळीत ।

वाटले रक्त गेले सुकून
पडली कोरड घशाला ।
वाटे मृगजळ पुढेच आहे
धावलो मीच कशाला ।

रस्ता सरता सरत नव्हता
धाप लागली श्वासाला ।
धडपडलो थोडा अडखळलो
लागलो शेवटी मार्गाला ।
Sanjay R.

Friday, October 9, 2020

" मुंबई स्वप्नांचे शहर "

मुंबई तर माझी
वाटे स्वप्नाचे शहर ।
कामासाठी भटकतो
थांबत नाही नजर ।

चकचकीत रस्ते आणि
लकलकीत गाड्या ।
नजर जाईल तिकडे
उंचच उंच माड्या ।

रस्त्यावर चालताना
किती माणसांची गर्दी ।
शोधली तर सापडेल
लोकलमध्ये अर्धी ।

वेळ नाही कुणास
जो तो घाईत ।
जातात सारे कुठे
नाही कुणास माहीत ।

एका कडेला समुद्र
फेकतो कशा लाटा ।
नेहमीच भरलेल्या
आहेत तिथल्या वाटा ।

जिथे तिथे खायला
वडा पाव भेळ ।
चालता चालता खातील
जेवायला नाही वेळ ।

जिकडे तिकडे दिसेल
श्रीमंती चा थाट ।
झोपडीत जाल तर
झोपायला नाही खाट ।

घर म्हणता कशाला
एका खोलीत संसार ।
आयुष्य भर पळतो
तरी पेलवत नाही भार ।

मुंबई शहर माझे
स्वप्न बघतो जीवनभर ।
दिवसामागे दिवस जातात
प्रवास चाले आयुष्यभर ।
Sanjay R.