तिळगुळाची ना
चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का
इतकं भारी ।
शब्दच शब्दांना
जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना
जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात
नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा
मंत्र ओठांच्या दारी ।
Sanjay R.
तिळगुळाची ना
चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का
इतकं भारी ।
शब्दच शब्दांना
जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना
जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात
नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा
मंत्र ओठांच्या दारी ।
Sanjay R.
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात ।
नाकात नथनी
कानात डुल ।
घे ना गं पोरी
गुलाबाचं फुल ।
डोळ्यात काजळ
ओठाला लाली ।
गुलाब फुलला
तुझ्या गं गाली ।
कपाळी बिंदी
केसात गजरा ।
मुखडा तुझा गं
सोन्याहुन साजरा ।
गालावर हसु नी
नजरेत बाण ।
दिसतेस किती गं
पोरी तु छान ।
नाजुक बांधा
अंगावर शालू ।
वाटतय किती गं
तुझ्याशी मी बोलु ।
रंभा तुच की
मेनका गं तु ।
इंद्रपुरीची की
अप्सरा गं तु ।
डोळ्यात बसली
मनात ठसली ।
विचारात तुझ्या गं
आठवण फसली ।
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात ।
Sanjay R.
एकांतात क्षणभर डोळे मिटता
आठवतो मज तो इतिहास जुना ।
तुजविण वाटे नको मज काही
समजावु कसे मी माझ्या मना ।
ह्रदयात माझ्या डोंगर आठवणिंचा
त्यातच शोधतो मी पाउल खुणा ।
ये परतुनी अंतरात माझ्या
फुलु दे अंगणात मोगरा पुन्हा ।
रोज बहरतो गुलाब अंगणी
पाकळ्यांचा सांग तु काय गुन्हा ।
झालेत कठोर काटे किती
मोगर्याविना किती गुलाब सुना ।
Sanjay R.
जमाना था वो
निकलते थे जब
लेकर सब झंडा ।
आजादीकी चाहतमे
जलती मशालको
दिये थे वह खंदा
देखो आजकल
निकलते हम लिये
पत्थर और डंडा ।
बरबादीका अब
न कोयी गम
जमाना हुवा अंधा ।
हसते हसते वो
पहन लेते थे तब
फासी का फंदा ।
अब तो राजनिती
और पैसोका ही
हुवा यह धंदा ।
न बचा अब राजगुरू
भगत सिंग जैसा
कोयी एक बंदा ।
इंसानोनेही तो
इंसानोको अब
कर दिया है गंदा ।
Sanjay R.
सकाळ असो वा संध्याकाळ
आकाशात रंगांचे मायाजाळ ।
विविधतेने नटलेले आभाळ
जपते मनही प्रसन्नतेची माळ ।
Sanjay R.