वहीचे पान कोरे
शब्दांची बघते वाट ।
मनात विचार शून्य
भावनांची कुठे गाठ ।
उभ्या आडव्या रेषा
वाकले कुणी ताठ ।
संवाद मुक झाला
भरले डोळ्यांचे काठ ।
प्रवास नाही सोपा
सरळ जरी ही वाट ।
बघ वळून तू मागे
फिरवू नकोस पाठ ।
Sanjay R.
पौर्णिमेच्या चंद्राचे
मनमोहक ते रूप ।
कोजागिरीच्या रात्री
आठवते तूच खूप ।
भरलेल्या दुधाचा
हाती येताच प्याला ।
दिसे रूप तुझे त्यात
हवा आरसा कशाला ।
मधुर गोडवा अमृताचा
तृप्त होते त्यात मन ।
तीच साखर ओठातली
आठवतात क्षण क्षण ।
Sanjay R.