Wednesday, October 2, 2024

अश्रू कोण ढाळतं

ओढ जर असेल तर
कोण कशास टाळतं ।
नसेल काहीच तर
अश्रूही कोण ढाळतं ।

प्रेम असेल मनात तर
विरहातही मन जळतं ।
राग जर क्षणाचा तर
नियमच कोण पाळतं ।

भाव मनात असेल तर
सारं मनालाही कळतं ।
दुःख मनात नसेल तर
आतच तेही हळहळतं ।
Sanjay R.

Tuesday, October 1, 2024

पाचोळा

तुमच्या सारखं मला
बिलकुल जमत नाही ।
वाटतं एकटाच पडलो
कसं ते गमत ही नाही ।

झाले आकाश निरभ्र
ढगांचा पत्त्ता नाही ।
भिजलो खूप पावसात
मनात ओलावाच नाही ।

पालवी सुकून गेली
उरले पानही नाही ।
गुलाब मोगरा कुठला
फुलला झेंडूही नाही ।

रुक्ष नीरस झाले सारे
पाचोळा दिसत नाही ।
लोपले हसू आता, पण
डोळ्यात अश्रू नाही ।
Sanjay R.


ऊन वारा पाऊस

काल पर्यंत पावसाने
झालो ओला चिंब ।
नव्हते आकाशात कुठे
सूर्याचे प्रती बिंब ।

आज भर दुपारी 
घामाने झालो ओला ।
परवा पडेल थंडी
कुठे ते स्वेटर बोला ।

निसर्गाचे आता
कळेच ना काही ।
कसलं जीवन हे
इथे शांतीच हो नाही ।
Sanjay R.

मन हळवे पान

ऐका देऊन ध्यान
उघडे करा कान ।
कुणा कशाची वान
देऊ नका हो तान ।

जितका द्यावा मान
वाढते तितकीच शान ।
पण हरपू नका भान
बघा होऊन लहान  ।

मन हळवे पान
जपाना नाती छान ।
सुटताच ही  जाण 
जीवनाचे होईल रान ।
Sanjay R.

Monday, September 30, 2024

काळीज

  " काळीज "
दुःख म्हणू मी कशास
आग पेटली काळजात ।
श्वास करती धडधड
बंध तुटले अंतरात ।
Sanjay R.