ओढ जर असेल तर
कोण कशास टाळतं ।
नसेल काहीच तर
अश्रूही कोण ढाळतं ।
प्रेम असेल मनात तर
विरहातही मन जळतं ।
राग जर क्षणाचा तर
नियमच कोण पाळतं ।
भाव मनात असेल तर
सारं मनालाही कळतं ।
दुःख मनात नसेल तर
आतच तेही हळहळतं ।
Sanjay R.
तुमच्या सारखं मला
बिलकुल जमत नाही ।
वाटतं एकटाच पडलो
कसं ते गमत ही नाही ।
झाले आकाश निरभ्र
ढगांचा पत्त्ता नाही ।
भिजलो खूप पावसात
मनात ओलावाच नाही ।
पालवी सुकून गेली
उरले पानही नाही ।
गुलाब मोगरा कुठला
फुलला झेंडूही नाही ।
रुक्ष नीरस झाले सारे
पाचोळा दिसत नाही ।
लोपले हसू आता, पण
डोळ्यात अश्रू नाही ।
Sanjay R.
काल पर्यंत पावसाने
झालो ओला चिंब ।
नव्हते आकाशात कुठे
सूर्याचे प्रती बिंब ।
आज भर दुपारी
घामाने झालो ओला ।
परवा पडेल थंडी
कुठे ते स्वेटर बोला ।
निसर्गाचे आता
कळेच ना काही ।
कसलं जीवन हे
इथे शांतीच हो नाही ।
Sanjay R.
ऐका देऊन ध्यान
उघडे करा कान ।
कुणा कशाची वान
देऊ नका हो तान ।
जितका द्यावा मान
वाढते तितकीच शान ।
पण हरपू नका भान
बघा होऊन लहान ।
मन हळवे पान
जपाना नाती छान ।
सुटताच ही जाण
जीवनाचे होईल रान ।
Sanjay R.
" काळीज "
दुःख म्हणू मी कशास
आग पेटली काळजात ।
श्वास करती धडधड
बंध तुटले अंतरात ।
Sanjay R.