केव्हाच सरला तो काळ
पिढ्यानपिढ्या एकत्र राहायचे सारे ।
विभक्त कुटुंब पद्धती आली आणि
वेगळे राहायचे शिरले वारे ।
Sanjay R.
रोजच वाजतात
रात्रीचे दोन ।
डोळाच लागत नाही
मनात बसले कोण ।
डोळ्यापुढे येते भूत
ठेवते मानगूट धरून ।
डोळे गच्च मिटलेले पण
घाम फुटतो दरदरून ।
फुटत नाहीत शब्द
श्वास घेतो मोठा ।
माणसाची काय ओळख
तोही आहे खोटा ।
Sanjay R.
कोण कुठली ही कशाची आशा
पावलो पावली तर होते निराशा ।
चित्त हरपते नी का बेभान होतो
मनालाच कळते मनाची भाषा ।
Sanjay R.