इथे कोण परका
आहे कोण वारीस ।
आई बापच करतात
मुलांची परवरिश ।
भरले आभाळ की
होते ना बारिश ।
डोळ्यात येतात अश्रू
नाही कुणाची साजिश ।
जवाबदार कोण याला
घेऊ कुणाचे मी नाव ।
संस्कार चालले सुटत
आपलेच तर देतात घाव ।
Sanjay R.
इथे कोण परका
आहे कोण वारीस ।
आई बापच करतात
मुलांची परवरिश ।
भरले आभाळ की
होते ना बारिश ।
डोळ्यात येतात अश्रू
नाही कुणाची साजिश ।
जवाबदार कोण याला
घेऊ कुणाचे मी नाव ।
संस्कार चालले सुटत
आपलेच तर देतात घाव ।
Sanjay R.
बाळाचे करता संगोपन
वेळही पुरेना ।
होते धावपळ किती
कष्ट कुणा कळेना ।
बाळ रडते जेव्हा
हृदयाची तुटते तार ।
आईच्या प्रेमाचा मी
सांगू किती सार ।
किंमत तिच्या दुःखाची
म्हातारपणी मिळते ।
आसव असतात डोळ्यात
दुःखात तीच जळते ।
Sanjay R.
कसा करायचा सांभाळ
जाऊन आईला विचारा ।
बाबाही सांगतील सारे
जरी असेल त्यांचा दरारा ।
लहानाचे केले मोठे
किती झेलल्या यातना ।
रात्री किती जागून काढल्या
दिल्या का कोणी सांत्वना ।
तिचेच आता म्हातारपण
नको झाले लेकाला ।
करे धाडले वृद्धाश्रमी
पोचलास का टोकाला ।
Sanjay R.
कशी असेल सांगा
पुढची ती पिढी ।
वेगळीच असेल ना
त्यावेळची ती घडी ।
आई वडिलांपासून दूर
स्वतः चे वेगळे घर ।
नको म्हातारे घरात
असेल का हाच स्वर ।
दोघांचा असेल संसार
तिसऱ्याचा होईल भार ।
नसेल प्रेम माया मनी
आपले पणाचाच विचार ।
सुख सुविधा असतील
नसेल कशाची कमी ।
आठवण येऊ नये म्हणून
आई वडिलांचे डमी ।
Sanjay R.
विचारात पडतो फरक
बदलते जेव्हा पिढी ।
पडतात मागे थोड्या
जुन्या काही रूढी ।
वागतो वाटेल तसे
माणूस असतोच मुडी ।
माझेच सारे बरोबर
म्हणतो उभारून गुढी ।
Sanjay R.