असू दे निर्णय चुकीचा
आता विचार नको कशाचा ।
येऊ दे संकट कितीही
मार्ग तर निघेलच यशाचा ।
हसायचे मस्त जगायचे
भरवसाच कुठे आयुष्याचा ।
कुणासाठी कोण थांबतो
मन्त्र एकच हा जगण्याचा ।
Sanjay R.
कशावर मी सांगू हक्क
काहीच इथे उरले नाही ।
अंधार दिसतो काळा
सूर्याचा तर पत्ताच नाही ।
चांदण्याही लुप्त झाल्या
चंद्र तर उगवतच नाही ।
मिणमिणते ते काजवे
का ते रात्री जागत नाही ।
Sanjay R.
सरले दिवस आता
करू काय जाता जाता ।
बसु द्या ना थोडे तरी
सांगतो मी माझी कथा ।
गाठीला आहेत बांधलेले
त्यात साऱ्याच व्यथा ।
प्रश्न आहे पुढ्यात
चालेना आता माथा ।
Sanjay R.
अंतरातल्या विचारांना
शब्दांची हवी साथ ।
अवतरते मग कविता
घेऊन शब्दांचा हात ।
भावार्थ त्या रचनेचा
दिसे काय या मनात ।
आनंदाची अनुभुती
ती आनंदाची प्रभात ।
Sanjay R.
छंद नव्हे हा असा
ही तर आहे नशा ।
बघा जरा याची
झाली कशी दशा ।
सदा हाती मोबाईल
जणू झाला तो पिशा ।
कळेना काही कसे
विसरला हो दिशा ।
काळ वेळ नाही काही
चालतात उठा बशा ।
Sanjay R.