Monday, May 16, 2022

भारत महान

जुनी किती ही संस्कृती
वाटावा कुणासही अभिमान ।
प्रत्येक जण पाळायचा
प्रत्येकाचाच सन्मान ।
जाती धर्म पंथ अनेक
हीच या देशाची शान ।
राजकारणाने केला घात
दिसे आता फक्त अज्ञान ।
लोभ मोह द्वेष पसरला
कोण मोठा कोण लहान ।
निघा एकदा बाहेर यातून
नका करू असा अपमान ।
देशासाठी जगू मरू या
सारेच म्हणू भारत महान ।
Sanjay R.


Sunday, May 15, 2022

दोष कुणाचा

नाही दोष कुणाचा
उपाय हा गुणांचा ।
बसायचे चूप चाप
अंतच लागेना मनाचा ।
घडते सुरळीत सारे
लागेना वेळ क्षणाचा ।
लोभ तर वाईटच
 असेना तो धनाचा ।
विचार स्वतःचाच नको
करा थोडा जनाचा ।
मिळेल सुख त्यातच
नको क्लेश अहंपणाचा ।
Sanjay R.

लग्न

कहाणी झाली पाहणी झाली
जुळले एकदाचे लग्न ।
मुलगा मुलगी झाले मग
स्वप्न पाहण्यात मग्न ।

बाप लागला मग कामाला
दागिने कपडे नवऱ्याला मुंदी
हॉल वाजंत्री काय काय हवे
जेवणात ठेवू म्हणे बुंदी ।

दिवसामागून लोटले दिवस
पत्रिकाही झाल्या आता वाटून ।
लग्नाच्या दिवशी नवरा नवरी
आले मांडवात नटून थटून ।

आली लग्न घटी म्हणता
उधळल्या साऱ्या अक्षदा ।
ब्यांडवाला तयार होता
बडवू लागला बदा बदा ।

लग्न लागले पंगती उठल्या
नवरा नवरी होते खुशीत ।
लेक निघाली सासरला मग
होते सगळेच आसवे पुसीत ।
Sanjay R.


शब्दही जड झाले

सुचेना काहीच मला
आज शब्दही जड झाले ।
बघून वाट मी थकलो
मन अंतरात जाऊन आले ।

आठवणींचा गुंता तेथे
काय त्यातून घेऊन आलो ।
मनच मग सांगून गेले
दूर तर मी तेव्हाच झालो ।

कोण मी कुठला कसा
मनात थोडा दुःखी झालो ।
खोटे खोटे का हसतो
पोरका मी तेव्हाच झालो ।
Sanjay R.


मैत्री

वाहत्या पाण्याची
कशी संथ धार ।
तुझ्या माझ्या मैत्रीचा
अगदी तसाच सार ।

नाव निघाली मैत्रीची
तिला मैत्रीचा आधार ।
दूर असूनही वाटे
जवळ किती तो पार ।

जुळवल्यानी जुळतात
असू दे वेगळे विचार ।
मित्र दिसताच मात्र
होतो मैत्रीचा संचार ।
Sanjay R.