अमृतापरी गोड
नाम तुझे देवा ।
नावात तुझ्या वाटे
जीवनाचा ठेवा ।
नको आम्हा काही
नको आम्हा मेवा ।
स्मरण तुझेच असू दे
नको कसला हेवा ।
भक्ती विना नको काही
हवी तुझीच सेवा ।
भक्तीत तुझ्या रंगू दे
हवा तूच आम्हा देवा ।
Sanjay R.
झाले गेले हो सरले सारे
आकाशातही नाहीत तारे ।
रात्र काळी अंधार झाला
करेल कोण कुणास इशारे ।
हलत नाहीत झाडे झुडपे
का कशाला थांबले वारे ।
घाला कुणी हो फुंकर जरा
वाटते जीवन आता खारे ।
आनंदच गेला निघून सारा
होणार कधी हे सारेच बरे ।
Sanjay R.
केला मी निर्धार आता
पुरे झाल्या पोकळ बाता ।
दूर तिकडे जाऊ कुठे
मिळेल काय जाता जाता ।
वाट ही कुठवर जाते
शब्द सरले गाता गाता ।
सरेल हे सारेच एकदा
उरेल काय हातही रिता ।
Sanjay R.