कितीही करा प्रयत्न
असते काही अटळ ।
नाही चालत इलाज
संपुष्टात येते बळ ।
निघून जाते सारे
मनात होते हळहळ ।
तर कधो फुले आनंद
अंतरात होई सळसळ ।
अवस्था या मनाच्या
होते किती खट्याळ ।
Sanjay R.
असेल छोटे गाव
अनोखे त्याचे नाव ।
लोकं तिथले भारी
खातात किती भाव ।
स्वभावाने मात्र शांत
नाही कशाची हाव ।
प्रेमळ किती मायाळू
जीवास जीव लाव ।
गरिबीत जगती सारे
देवा त्यांना तू पाव ।
सुखी कर साऱ्यास
चरणी तुझ्याच धाव ।
Sanjay R.