माणूस म्हणजे कथा
व्यक्त करतो व्यथा ।
घ्याल लिहायला तर
होईल मोठी गाथा ।
करतो तो पालन
प्रत्येक पूर्वापार प्रथा ।
होते सुरुवात इतिने
निरंतर तो झटतो स्वतः ।
अंत येता होतो दूर
ठेऊन पायरीशी माथा ।
सम्पत नाही कहाणी
उरते सारे जाता जाता ।
Sanjay R.
नवरंगांनी रंगलेली ही दुनिया
त्यात रंगच तुझा तो वेगळा ।
चित्रकार तो दूर कुठे अदृश्य
विचार मनात त्याच्या आगळा ।
हिरवी झाडं शुभ्र आकाश