Thursday, August 13, 2020

" हवा विरंगुळा "

धकाधकीच्या या जीवनात
हवा विरंगुळा काही क्षणाचा ।
येईल मन विसवून थोडे
आनंद किती या जीवनाचा ।

चाले सदा धावपळ किती
प्रश्न मोठा या पोटाचा ।
रक्ताचे होते पाणी आणि
पालथा डोंगर कष्टाचा ।

मैत्री नाते बंध किती हे

धागा कसा या जीवनाचा ।
अंत हे तर पूर्णच सत्य
विचार नकोच दुःखाचा ।
Sanjay R.


Wednesday, August 12, 2020

" मन अधीर झाले "

मन अधीर झाले
कशा कशात गेले ।
आकाश इतके विचार
फिरून नभात आले ।

गती किती या विचारांची
नाही विसावा मनाला ।
वाटे कधी मनात
आता सांगू मी कुणाला ।

भिरभिर पाहे डोळे
कान वेध तो घेती ।
मन भरले जरी तुडुंब
जागा अंतरात रीती ।
Sanjay R.

Friday, August 7, 2020

" नशीब फिराले वेळ नाही लागत "

बाबू घे ना हातात ईळा
पर लटकवू नको गळा ।

टाक ना कापून तन
पिकन जास्त मन दोन मन ।

येईन पैसा हातात त
लागण तुह्याचं कामात ।

पैशानच होते बापा सारं
दुःख गरीबच नाही बरं ।

लेकरायले नाही शाळा
चालते निस्ता खेळा ।

पडलं कोणी बिमार पोट्ट
औषध कुठी न डॉक्टर कुठी ।

मेहनतीवर तुयाच बापू
वाजते राजकारणात भोपु ।

नशीबच तुह गा फुटक
आयुष्यही झालं तुटक ।

कधी निसर्गाचा घात
धुते व्यापारी बी हात ।

पर हारू नको असा
दिवस तुह्या बी येईन तसा ।

सोडू नको गा मेहनत
नशीब फिराले येळ नाही लागत ।
Sanjay R.


Thursday, August 6, 2020

" तू कोर चंद्राची "

तू कोर चंद्राची
राणी आहेस अंधाराची ।

टीम टीमती तारे
सभा आकाशाची ।

धराही फुलली
चमचम काजव्याची ।

ताल सूर जमला
मैफिल रातकिड्यांची ।

मधेच डोकावून जाती
आरास तिथे ढगांची ।

उठून सारे जाती
लागता चाहूल सूर्याची ।
Sanjay R.


Wednesday, August 5, 2020

" आहे मन मधुर "

मनच आहे ते
असंख्य विचारांचं घर ।
सोडलं मोकळं
पळतं दूर दूर ।
 ठेवलं बंधून तर
होतं किती आतुर ।
गोधळत जेव्हा ते
लागत नाही सूर ।
सोडले धैर्य तर
होते चुर चुर ।
ठेवता अंकुश थोडा
येई आनंदाला पूर ।
जगायचे आनंदात
आहे मन मधुर ।
Sanjay R.