कुणाचे कुणाशी
कशाचे हो नाते ।
कामा शिवाय हो
जवळ कोण येते ।
नको माय बाप
नको भाऊ बहीण ।
राजा राणी दोघच
माझं मीच पाहीन ।
कुणाची कुणाला
गरज कुठे उरली ।
छोटीशी फॅमिली
माया आता सरली ।
Sanjay R.

कुणाचे कुणाशी
कशाचे हो नाते ।
कामा शिवाय हो
जवळ कोण येते ।
नको माय बाप
नको भाऊ बहीण ।
राजा राणी दोघच
माझं मीच पाहीन ।
कुणाची कुणाला
गरज कुठे उरली ।
छोटीशी फॅमिली
माया आता सरली ।
Sanjay R.
दिवसभर चाले
नुसती पळा पळी ।
रात्री शांती नि
परत तेच सकाळी ।
कुणाकडे असे
रोजच दिवाळी ।
कुणाच्या भुकेला
नसे एक पोळी ।
उपसतो कुणी कष्ट
रक्त आपले जाळी ।
बघतो बसून कोणी
वाजवितो टाळी ।
गरीब कुणी श्रीमंत
लिहून त्याच्या भाळी ।
जगाची ना हो या
आहे रीतच निराळी ।
Sanjay R.
स्वातंत्र्य आहे तुम्हाला
बोला काय वाट्टेल ते ।
बिघडतं कुठं काही
विचारही तुमचेच ते ।
शिव्या घाला आडवे पाडा
माळीसाठी काढा जोडा ।
संस्कृतीला फोडा झोडा
माणुसकीला असेच तोडा ।
प्रत्येकाच्या मनात
असते एक स्वप्न ।
गाव असो वा शहर
चाले स्वप्नात जगणं ।
पोटासाठी चाले कष्ट
कष्टामध्ये तो मग्न ।
पाठ टेकवताच रात्री
आठवतात सारे विघ्न ।
निघून त्यातून मग
बघतो बंद डोळ्यात स्वप्न ।
हवं तसं अनुभवतो मग
तेच त्याच खरं जगणं ।
Sanjay R.