गोड आंबट बोरं
वेचत होती पोरं ।
बालपण आठवलं
आलं डोळ्यापुढे सारं ।
घुसून कुणाच्या शेतात
तोडायचे पेरू आणि बोरं ।
कळलंच कुणाला तर
तयार खायला मार ।
मजा यायची खूप
सम्पलं आता सारं ।
Sanjay R.

गोड आंबट बोरं
वेचत होती पोरं ।
बालपण आठवलं
आलं डोळ्यापुढे सारं ।
घुसून कुणाच्या शेतात
तोडायचे पेरू आणि बोरं ।
कळलंच कुणाला तर
तयार खायला मार ।
मजा यायची खूप
सम्पलं आता सारं ।
Sanjay R.
तू बोलूच नको
मला आता बोलायचं आहे ।
तू बघूही नको
मला पण बघायचं आहे ।
काय करू काय नको
सगळंच तर करायचं आहे ।
वेळ नाही आता
अजून थोडं हसायचं आहे ।
लहानाचा झालो मोठा
मोठं अजून व्हायचं आहे ।
तो तिथं दारात उभा
खरंच का मरायचं आहे ।
नको नको थांब थोडा
जाऊन पुढे यायचं आहे ।
असलास तू मृत्यू जरी
थोडं मला जगायचं आहे ।
Sanjay R.
माणूस म्हणू कसा
तू सांग ना रे जरा ।
नाही तूझ्यात माणूस
म्हणू तुला कसा मी बरा ।
तुझ्यापेक्षा बघ
किडा मकोडा रे बरा ।
मन तुझं खोटं
नाही तू रे खरा ।
असा कसा रे तू
भासतो विद्वान जरा ।
माणुसकीचा नाही रे
गुण तुझ्यात खरा ।
हलते ते झाड
जेव्हा वाहतो वारा ।
मुळ देते मग आधार
भार सोसतात सारा ।
मूळ तुझे रे अधर
करतो तूच मारा ।
उद्धवस्त करून सोडतो
तू आपलाच पसारा ।
नको म्हणू तू माणूस
तू नाहीस रे बरा ।
कर विचार थोडा
होशील का तू माणूस जरा ।
Sanjay R.
बापू तुम्ही आम्हास तेव्हा
का दिली हो ही अशी खादी ।
आम्हाला तर हवी
फक्त आणि फक्त आजादी ।।
नेते आमचे बघा कसे
चिकटले आहेत घेऊन गादी ।
भारताची तुमच्या बघा
झाली कशी हो बरबादी ।।
नाव तुमचे घेऊन कसे
मिरवतात हे मानवता वादी ।
म्हणतात सारे आम्ही
आहोत असेच सत्यवादी ।।
शुभ्र कपड्या आड बघा
आहेत कसे हे दहशतवादी ।
देश नको, लोक नको
कुठले हो हे समाजवादी ।।
Sanjay R.
नाही ज्याला आचार
मनात क्षुद्र विचार ।
अंतरात होतो प्रचार
असतो खिसा लाचार ।
पसरतो पुढे हात चार
करून किती अत्याचार ।
सळसळतो भ्रष्टाचार
हा माणुसकीचा दुराचार ।
भरला सगळाच बाजार
साऱ्यास झाला आजार ।
नाही उरला उपचार
फक्त झेलायचे प्रहार ।
Sanjay R.