
Thursday, January 2, 2020
" रे बळीराजा कवितेचे प्रकाशन "

" वर्ष वीस वीस"
वर्षा मागून किती वर्ष झाले ।
नववर्षाची तर रात्रच न्यारी
नाचून काढली करून तयारी ।
लहान थोरांना पण खुशी मोठी
सारेच जमले नाचाय साठी ।
बारा वाजता ओरडले हॅपी ।
कुणी कुणाचा घेतला पपी ।
झिंगले किती पडले किती
ती पण दिसली वेगळीच रीती ।
जुन्या वर्षाच्या आठवणी मनात
भरायचा उत्साह नवीन वर्षात ।
राहिलं सुटलं सारं करायचं
आनंदात अगदी मस्त जगायचं ।
Sanjay R.

" आली थंडी "
पहिला यंदा पावसाचा हिसका
आली थंडी थोडे सरका ।
पेटवा ना शेकोटी अहो काका
प्रसंग आहे मोठाच बाका ।
नका विचारू चहा घेता का
थर थर कापतोय वाटतो धोका ।
Sanjay R.
Monday, December 30, 2019
" एकतीस डिसेंम्बर.... "
एकतीस दिसेम्बर मांगचा
आठवते अजून भौ मले ।
एक थेंब घ्याची न्हाई
ठरवलं होतं हे सांगतो तुले ।
काय वरीस निंघाल गा
प्याच लागली ना मले ।
पहिल्याच दिशी सांगतो
भेटाले दुरून दोस्त आले ।
न्हाई न्हाई म्हनता भौ
घेऊन गा मले गेले ।
घ्याच लागते म्हने सारे
न्हाईत पैसे द्या लागन तुले ।
रिकामा महा खिसा मुन
जीवावर आलत भांडे घासाले ।
पेउन झालो मोकळा तवा
सुखरूप पोचलो घराले ।
तवा पासून राजा ठरवलं म्या
सोडाची गोठ सांगाची नाई कोनाले ।
प्यावं वाटलं त एकटच जाऊन
खाऊन पेउन लागाच रस्त्याले ।
पायता पायता सरलं वरीस
पोचलो ना एकतीस डिसेंम्बरले ।
झक्कास पडलं पार सारं
बाकी पाहू पुढच्या वरसाले ।
Sanjay R.
" जीवन रंग "
काय जीवनाचा रंग
जगणेच आहे व्यन्ग ।
स्वप्नांचा होतो भंग
शोधायचे त्यात तरंग ।
होऊन विचारात दंग
घर ठेऊनिया संग ।
करायचा नेटका संसार
मुखी तुकोबांचा अभंग ।
Sanjay R.