Saturday, July 14, 2018
Thursday, July 12, 2018
" कसं जायचं बाहेर "
सांग ना गं आई
कसं जायचं बाहेर ।
पावसाचे असावे कां
इथेच कुठे माहेर ।
दहा दिवस झालेत
त्याच्या पाहुणचाराला ।
अजून किती मुक्काम
कोण जाईल विचारायला ।
शाळा नाही खेळ नाही
लागलो मित्रांना विसरायला ।
मूडच नाही लागत माझा
आता अभ्यासाला बसायला ।
ये ये म्हटलं तर
इतका का रे येतो ।
सांगत हि नाही
कधी तू जातो ।
जा म्हणा आता
परत तू येशील ।
थोडं दिवस आम्हा
उसंत तर देशील ।
काकांच्या शेतात छान
पुन्हा तू पडशील ।
वीसरु नको बाबा नाहीतर
जाऊन कुठे दडशील ।
Sanjay R.
Tuesday, July 10, 2018
" पाऊसच पाऊस "
कसा हो हा पाऊस
पड पड म्हटलं तर पडत नाही ।
आणी पडलाच तर
थोडीही उसंत देत नाही ।
कोरड्या नद्या कोरडे नाले
नावही पैलतीरी नेत नाही ।
आलाच कधी तर
जीव घेतल्या शिवाय जात नाही ।
रिमझिम रिमझिम कोसळेल असा
नदी की नाली काळतच नाही ।
खूप तु रे बरसला
आता विचार कर काही ।
सूर्य कूठे असेल
सारे शोधताहेत दिशा दाही ।
उघड थोडं दार
साऱ्यांचीच झाली त्रेधा तिरपट त्राही ।
थांब थोडा आता
सांगून जा तू , परत येणार कि नाही ।
Sanjay R.
Sunday, July 8, 2018
" चाला वारीले जाऊ "
चालतं का गा भाऊ
वारी ले जाऊ ।
डोये भरून विठ्ठलाले
याची देही पाऊ ।
वरकऱ्याच्या संग संग
काही दिस राहू ।
जय हरी विठ्ठलाचे
भजन थोडे गाऊ ।
चंद्रभागेच्या पाण्यामंदी
एक दिस न्हाऊ ।
आषाढी एकादशीले
पंढरीतच राहू ।
माऊलीच्या दर्शनान
धन्य आपुन होऊ ।
चाल न गा भाऊ
वारी ले आपुन जाऊ ।
Sanjay R.
Friday, July 6, 2018
" स्वातंत्र्य "
हे स्वातंत्र्य विरांनो
किंमत कुणास तुमच्या बलिदानाची ।
उरला इथे स्वैराचार
हीच गोष्ट इथे अभिमानाची ।
गांधी नेहेरु टिळक भगतसिंग
थोर लेकरं तुम्ही या भूमातेची ।
स्वातंत्र्याचे स्वप्न तुमचे
आग लागली पारतंत्र्याची ।
गीत गाता राष्ट्र गाण
वाटे तिरंगा आम्हा महान ।
नाही उरले सारे सरले
बघा किती आता झालो लहान ।
राजकारणात हा देश नासला
आता चिंता उरली खुर्चीची ।
मान सन्मान नाही इमान
वाटे त्यातच त्यांना शान ।
भेद भाव जाती वाद
पेटत आहे सगळे रान ।
मारणे मारणे रोजचेच झाले
करून सोडले इथे स्मशान ।
Sanjay R.