नको वाटतो मज
शब्दच हा विरह ।
तुजवीण सांग मी
मनाचा होतो दाह ।
असता तुझी साथ
नसते कुठली पर वाह
तु आणी मी दोघांचा
होउ दे एक प्रवाह ।
Sanjay R.
नको वाटतो मज
शब्दच हा विरह ।
तुजवीण सांग मी
मनाचा होतो दाह ।
असता तुझी साथ
नसते कुठली पर वाह
तु आणी मी दोघांचा
होउ दे एक प्रवाह ।
Sanjay R.
तुझ्या सहा शब्दांना
माझा एकच शब्द पुरे ।
जन्म म्हण वा म्रुत्यु
कुणास हवेत हार तुरे ।
नको अडकउस शब्दात मज
शब्दांची जशी होते कवीता ।
डोळ्यात जरी स्वप्नांची आरास
तरी जन्म जातो रीता रीता ।
शब्द शब्दांना करुन गोळा
भाषा संग्रह रुप ल्याला ।
विचारांच्या त्या दशदीशा
जिवन झाले अमृत प्याला ।
Sanjay R.
आले आले बघा
पावसाचे दिवस ।
बघायचा आता
जमीनीचा कस ।
नागरन वखरन
झाली खुप मेहनत ।
येउ दे रे पाउस
करील सारे स्वागत ।
करायची पेरणी
गातो पावसाची गाणी ।
कापुस सोयाबीन
का देतील खुप नाणी ।
बळी राजा जगतो
फक्त आशेवर ।
पण मेहनत त्याची
होते मणभर ।
दाण्यात बघतो
स्र्वप्न सुंदर ।
पण हाती त्याच्या
का येते कणभर ।
आकाशात तो
नेहमी बघतो ।
उमेद नवीन
घेउन तो जगतो ।
देवा स्वप्न त्याची
होउ दे रे पुरी ।
मुलांना खाउ दे
श्रिखंड पुरी ।
Sanjay R.
थंड थंड वारा
सोबतीला
पावसाच्या धारा ।
आकाशात बघा
ढगांचा फेरा ।
सुकला गळा
तहानलेली धरा ।
आला आला पाउस
नदी नाले भरा ।
फुटु दे अंकुर
हिरवळ पेरा ।
Sanjay R.
नभ काळे जमले आकाशात
होता गडगड धडधड होइ मनात ।
होताच दोन नभांची तकरार
त्यातुन होइ विजेचा लखलखाट
कळलेच नाही मजला आज
आणी झाली पावसाला सुरुवात ।
झाडे झडुप भिजले सारे
आनंदाने न्हाली धरा सुगंधात ।
रुजेल बी फुलेल अंकुर
फळेल वसुंधरा नवचैतन्यात ।
Sanjay R.
खरच काय हालत झाली असेल त्या छोट्या छोट्या चिमण्याची । छोटासा जीव त्यांचा । काल अंगणात लाल मिरच्या वाळत होत्या । आणी या छोट्या छोट्या चिमण्या त्या मिरचीतलं बी टिपत होत्या । मला हेवा वाटला त्यांचा । जेवायला बसलो आणी वाटलं चला आपणही एखाद मिरची खाउन बघावी । खाल्ली पण वरुन चांगलं दोन ग्लास थंड पाणी आणी साखर खावी लागली । आणी आजची सकाळ तर न विचारलेलीच बरी । मनात विचार आला खरच आपली ही अवस्था झाली तर त्या चिमण्यांची काय व्यथा असेल । त्या तर दिवसभर नुसतं मिरचीचं बी टिपत होत्या ।
जाउ द्या मनात आलं ते लिहीलं ।
आता बरं वाटतय ।
Sanjay R.